
-संतोष आटोळे
इंदापूर : पुणे, सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणामध्ये सोमवार (ता.28) सकाळी 6 वाजेपर्यंत 97.13 टक्के पाणीसाठा झाला.तर धरणात 44 हजार 808 क्युसेक्स ने पाणी आवक होत असून यामुळे धरणामधून भीमा नदी पात्रात 50 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला असून प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.