माढा - स्वतः दोन दिवस कोणत्याही निवाऱ्याशिवाय अन्नपदार्थाशिवाय उपाशी राहून माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या पुरात केवड येथील मुसळे वस्तीवरील शाबू चव्हाण, मदन चव्हाण या बापलेकांनी २०० जनावरांची जीव वाचविले..माढा तालुक्यातील सीना नदीकाठी असलेल्या केवड गावाला पुराने वेढले होते. त्यावेळी शाबू चव्हाण, मदन चव्हाण या बाप लेकाने त्यांची स्वतःच्या वस्तीवरील जनावरे पुराच्या पाण्यापासून दूर नेण्यासाठी सोडली व उंच भागाकडे निघाले.वेळ रात्रीची होती त्यांना आजूबाजूच्या वस्तीवरील जनावरेही बांधलेली असल्याने ती पुराच्या पाण्यात मरून जातील यामुळे व या दोन्ही बापलेकांचे जनावरांवरती विलक्षण प्रेम असल्याने त्यांनी आजूबाजूच्या वस्तीवर बांधलेली जनावरेही सोडून स्वतःच्या जनावर बरोबर घेऊन उंच भागाकडे निघाली अशा पद्धतीने त्यांनी आजूबाजूच्या वस्तीवरील सुमारे 200 जनावरे उंच भागाकडे नेली..दोन दिवस केवळ गावाला पुराने वेढा दिलेला होता. हे दोन्ही दिवस या बाप-लेकाने या सर्व जनावरांना आजूबाजूला ऊस व मिळेल तो चारा खाऊ घातला. हे करत असताना त्यांच्या स्वतःच्या वस्तीतही पाणी शिरल्याने त्यांना दोन दिवस जेवता आलं नाही आणि पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी निवाराही मिळाला नाही..सलग दोन दिवस त्यांनी या जनावरांची सेवा केली. या अडाणी बापलेकाच्या या कामामुळे प्रभावित होऊन केवडमधील ग्रामस्थांनी त्यांना नवीन कपडे देऊन कृतज्ञता व्यक्त केली.संत तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी भूतदयेचा उल्लेख केला आहे.'भूतां परस्परे जडो प्रेमभावे।तेणे सर्वस्वी सुखाचे ठावे॥'.सर्व जीवांमध्ये प्रेमभाव निर्माण झाला की खरे सुख मिळते.- भूतदया ही मोक्षाचा मार्ग आहे असे तुकाराम सांगतात.संत निळोबाराय हेहीअखंड भूतदया मानसीं । वाचे नाम अहर्निशी ।तया न बिसबे हषिकेशी । मागें मागें हिंडतसे ॥'.या अभंगात संत निळोबा म्हणतात की ज्याच्या मनात अखंड भूतदया आहे आणि जो सतत नामस्मरण करतो, त्याच्या मागे स्वतः हृषीकेश (भगवंत) चालत असतो. भूतदया आणि नामस्मरण यांचा संगम म्हणजेच भगवंताची प्राप्ती आहे.अर्थात या बापलेकांनी संत तुकाराम व संत निळोबाराय यांचे अभंग सार्थ ठरवणारे काम केलेले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.