मोहोळ - पुढील दोन-तीन दिवस फील्डवरच रहा, आणखी यंत्रणा वाढवा, तात्काळ पंचनामे पूर्ण करा, सततच्या पावसामुळे पिके खराब झाली आहेत, पिवळी पडून वाया गेली आहेत, ज्या भागात शासकीय यंत्रणेला पाऊस कमी दिसतो..परंतु शेतकऱ्यांची पिके पिवळी पडली आहे, ती वाया गेली आहेत, त्याचेही पंचनामे करा, क्षेत्र जास्त लागलं तरी चालेल पण कमी करू नका, पंचनामे अंशतः उल्लेख करताना पूर्णतः याचा उल्लेख करत असताना शेतकऱ्यांच्या घराचा तडा गेला असेल तरीही ती पूर्णतः मध्ये घेण्यात यावीत अशा सूचना महसुल व गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी प्रशासनाला दिल्या..मोहोळ येथे पंढरपूर व मोहोळ विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या संदर्भात आढावा बैठक मोहोळ येथे आयोजीत करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात दहा घरकूल लाभार्थांना जागेच्या नोदी देण्यात आल्याया बैठकीचे प्रास्ताविक निवासी नायब तहसीलदार सुधाकर धाइंजे यांनी केले. यावेळी प्रातांधिकारी सचिन इथापे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकुर,आमदार राजू खरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चवरे व सर्व विभागाचे अधिकारी त्यांचे सहकार्य कर्मचारी उपस्थित होते..यावेळी आमदार राजू खरे म्हणाले सध्या सीना नदीत दोन लाख क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. पिके वाया गेली, जनावरे वाहुन गेली या सर्व नोंदी पंचनाम्यात घ्या अशी मागणी केली.जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी मतदार संघाच्या समस्या मांडताना सरकारची पर्यन्य मापके व्यवस्थित नाहीत, त्यामुळे पावसाच्या नोंदी व्यवस्थित होत नसल्याच्या समस्येकडे लक्ष वेधले, तसेच पुरवठा विभागाकडून गव्हाच्या असणाऱ्या 50 किलो पिशव्या या 50 किलो नसतात त्या 48 किलो भारतात त्यामुळे पाहिजे तेवढा माल दुकानदारांना मिळत नसल्या बाबतचा विषय मांडला..राज्यमंत्री कदम म्हणाले, ज्यांना घरकुले मंजूर झाली आहेत त्या घरकुलांना प्रत्येकी पाच ब्रास वाळू देण्यात येण्याच्या सूचना करण्यात आल्या. या बाबत अंतर जास्त होत असेल तर त्या ठिकाणी जवळच्या गावातून वाळू उपलब्ध करावी जेणे करून वाहतूक खर्च कमी लागावा.या बाबत गट विकास अधिकाऱ्यांनी त्या त्या गावांमध्ये लाभार्थ्यांना शासनाकडून मोफत वाळू दिली जाते हे सांगावे. ज्या प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेच्या ताब्यात नाहीत त्या देण्यात याव्यात.अशाही सुचना त्यांनी दिल्या.तर शेतकऱ्यांना तातडीची पाच हजार रुपयाची मदत देण्यास सुरवात करण्यात यावी अशाही सूचना प्रशासनाला दिली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.