नवेखेड (सांगली) :सांगली जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामासाठी एक लाख अकरा हजार हेक्टर क्षेत्रावर गाळपासाठी ऊस उपलब्ध होणार आहे .जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांना जिल्ह्याच्या सीमेवरील दोन अश्या एकूण १४ साखर कारखाना हा ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे गतवर्षीपेक्षा गाळपासाठी उसाची वाढ झाली आहे.कारखान्यांनी सर्व नियम व अटी पाळून गाळप हंगामाची तुतारी केली होती.परंतु गेली आठ ते दहा दिवस झाले कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने हा हंगाम लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.या वर्षी गाळपासाठी जादा ऊस उपलब्ध होणार असल्याने व हंगाम सुरवातीला लांबल्याने त्याचा परिणाम एकूण हंगामावर होईल.
२०१९ ला आलेला महापूर तसेच नंतर ही झालेला चांगला पाऊस यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली.पर्यायाने ऊस लागवडीत वाढ झाली.तो ऊस २०२० च्या २१ गाळप हंगामासाठी तुटणार आहे.
राजाराम बापू कारखान्याची चार युनिट,तसेच हुतात्मा,क्रांती,विश्वास, क्रांती,मोहनराव शिंदे,निनाईदेवी, दत्तइंडिया,सोनहीरा ,उदगिरी हे कारखाने गाळपासाठी सज्ज आहेत त्याच बरोबर तासगाव कारखाना ही या वर्षी गाळप करेल.तर कोल्हापूर सातारा जिल्याच्या सीमेवरील वारणा व कृष्णा या कारखान्यांचे ही जिल्यात चांगले गाळप होईल.
आडसाली,पूर्वहंगामी,सुरू, खोडवा आशा पद्धतीने जिल्यात एक लाख अकरा हजार हेकटर उसाची गाळपासाठी नोंद आहे.
तालुका निहाय नोंद क्षेत्र असे(हेकटरमध्ये)
मिरज १८६७९
वाळवा ३५६५८
शिराळा ८१४५
जत ७११
कवठेमहांकाळ ४१७६
तासगाव ६९४६
पलूस १३६७९
खानापूर ३९७२
आटपाडी १३३०
कडेगाव १८६४७.
संपादन - अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.