बेळगाव : राणी चन्नमा विद्यापीठाने (आरसीयू) पदवी, पदव्युत्तर आणि एमबीए परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. यापूर्वी ७ एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत होणाऱ्या विविध विषयांचे पेपर १९ एप्रिलपासून ४ मे पर्यंत होणार आहेत. यासंबंधी पत्रक काढून विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना कळविले आहे. परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असल्याने विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.
परिवहन कर्मचारी ७ एप्रिलपासून संपावर आहेत. त्यामुळे आरसीयूने ७ ते ९ एप्रिलपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्याची माहिती यापूर्वीच दिली होती. मात्र, गुरुवारी (९) पुन्हा परीक्षा
तारखेमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती दिली. यासंबंधी स्टुडंट पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सूचनाही केल्या आहेत.
विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांतील पदवीच्या ७ एप्रिलपासून १२ एप्रिलपर्यंत होणाऱ्या पदवीच्या परीक्षा १९ एप्रिल ते २४ एप्रिलपर्यंत होणार आहेत. ७ रोजीचा पेपर १९ रोजी, ८ रोजीचा पेपर २० रोजी, ९ रोजीचा पेपर २१ रोजी, १० रोजीचा पेपर २२ रोजी, ११ रोजीचा पेपर २३ रोजी, १२ रोजीचा पेपर २४ रोजी होईल.
पदव्युत्तरच्या ७ एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत होणारे पेपर २५ एप्रिल ते २९ एप्रिलपर्यंत होणार आहेत. ७ रोजीचा पेपर २५ रोजी, ८ रोजीचा पेपर २६ रोजी, ९ रोजीचा पेपर २७ रोजी, १५ रोजीचा पेपर २८ रोजी, १६ रोजीचा पेपर २९ रोजी होईल. एमबीए परीक्षेचे ७ एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत होणारे पेपर २५ ते ४ एप्रिलपर्यंत होणार आहेत. ७ रोजीचा पेपर २५ रोजी, ८ रोजीचा पेपर ३० रोजी, ९ रोजीचा पेपर २ मे रोजी, ५ रोजीचा पेपर ३ मे रोजी, तसेच १६ एप्रिलचा पेपर ४ मे रोजी होणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.