पाणी प्रश्‍नासाठी सोलापूरहून मुंबईला जाणार चालत 

पाणी प्रश्‍नासाठी सोलापूरहून मुंबईला जाणार चालत 

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 14 गावांना उजनी धरणातून पाणी मिळावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विश्‍वजित चौगुले हे सोलापूर ते मुंबई पदयात्रा करणार आहेत. पाणी प्रश्नाची भीषणता शासन आणि प्रशासनापुढे मांडण्यासाठी मुंबईला चालत जाणार असल्याचे श्री. चौगुले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

हेही वाचा : झेडपी अध्यक्षपदामुळे मोहितेंचे समाधान? 

उजनी धरणाचे पाणी मिळावे
दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 46 गावांना धरणाचे पाणी मिळाले पाहिजे या मागणीसाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून आंदोलने केली जात आहेत. याच प्रश्‍नावर पहिली पाणी परिषद तत्कालीन महसूल मंत्री (स्व.) विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत कासेगाव येथे पार पडली होती. मागील काही वर्षात तालुक्‍यातील 32 गावांना उजनीचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासन दरबारी झाला आहे मात्र अद्याप तो पूर्णत्वास आला नाही. 32 गावांना भविष्यात पाणी मिळेल अशी आशा आहेत, मात्र उर्वरित 14 गावांना उजनी धरणाचे पाणी मिळावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

निवेदन देण्यात येणार
या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विश्‍वजित चौगुले हे सोलापूर ते मुंबई पदयात्रा करणार आहेत. 4 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी चौकातून या पदयात्रेला सुरवात होईल. 17 किंवा 18 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन उजनीच्या पाण्यापासून वंचित असलेल्या 14 गावांच्या पाणी प्रश्‍नी निवेदन देण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस प्रा. राज साळुंखे, संजय चौगुले, सुहास भोसले, मोहन बरडे, समाधान जाधव आदी उपस्थित होते 
 
हेही वाचा : सोलापूर राष्ट्रवादीत नेते आहेत, नेतृत्व नाही 

या गावांना हवे आहे पाणी 
दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील कासेगाव, गंगेवाडी, उळेगाव, उळेवाडी, वडजी, वरळेगाव, पिंजारवाडी, मुस्ती, बोरामणी, बक्षिहिप्परगा, मुळेगाव, मुळेगाव तांडा आणि तांदूळवाडी आदी गावे उजनीच्या पाण्यापासून वंचित आहेत.



दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येने रौद्ररूप धारण केले आहे. या पाणी प्रश्नाची भीषणता शासन आणि प्रशासनापुढे मांडण्यासाठी मी सोलापूरहून मुंबईपर्यंत चालत जाणार आहे. मुंबईच्या वाटेवरील गावांमध्ये मुक्काम असणार आहे. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आल्यापासून असून उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. सीमावर्ती भागात असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 14 गावांना पाणी द्यावे अशी आमची मागणी आहे. 
- विश्‍वजित चौगुले, 
सामाजिक कार्यकर्ते, ता. दक्षिण सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com