
बेळगाव : गवत खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे शेतकरी आपली गवत गंजी शिवारातच स्वतःहून जाळत आहेत. मागील दोन वर्षापासून ही स्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे. शहापूर, अनगोळ, जुने बेळगाव, वडगाव शिवारात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. मळणीनंतर हे गवत शेतकरी शेतातच ठेवून देतात. उन्हाळ्यात हिरे बागेवाडी, महाराष्ट्र चंदगड तालुका व बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील पशुपालक शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी म्हणून या शिवारातील गवत गंजी खरेदी करतात. प्रतिएकरी गवत गंजीला पाच ते सात हजार रुपये दर शेतकऱ्यांना मिळतो. पण मागील दोन वर्षापासून सारा खरेदीकडे पशुपालक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली त्यामुळे हा चारा शेतातच पडून राहत आहे.
त्यामुळे शेतातील जागाही व्यापली जात असून पीक घेण्यात अडचणी येतात. यासह पावसाळ्यात हा चारा कुजून जातो. ही समस्या टाळण्यासाठी शेतकरी आपल्याच चाऱ्याला जाळत असून ही राख शेतामध्ये टाकून देत आहेत. मागील तीन वर्षापासून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा अवेळी पावसामुळे मशागत देखील लांबली असून पेरणी हंगाम देखील लांबणार आहे. अवेळी पावसामुळे शेतातील गवत गंजी कुजण्याची भीती असल्यामुळे शेतकरी या गवत गंजीला आग लावत आहेत. मात्र यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.