कडेगाव : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसह अन्य मित्रपक्षांशी आघाडीबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल. त्यासाठी काँग्रेसची सर्व नेतेमंडळी, कार्यकर्ते यांचे मत विचारात घेतले जाईल व याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही चर्चा केली जाईल, त्यानंतरच आघाडीबाबत काय तो निर्णय होईल, अशी माहिती आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
कदम म्हणाले, ‘जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुका काँग्रेस ताकदीने व जोमाने लढवणार आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांबरोबर बैठका सुरू केल्या आहेत. तसेच मित्रपक्षांबरोबरही बोलणी सुरू आहेत. जिल्ह्यात काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन ताकदीने कामाला लागलो आहे. त्यासाठी जिल्हाभर कार्यकर्त्यांचे मेळावे, बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. पक्षाचे विचार तळागाळात पोहोचवून जिल्ह्यात काँग्रेसची भक्कमपणे उभारणी केली जाईल, अशा रीतीने जिल्हा ढवळून काढून सर्वत्र काँग्रेसमय वातावरण निर्माण केले जाईल. आगामी सर्व निवडणुकांसाठी सध्या अनेक इच्छुक असले तरी सर्वांची मते विचारात घेऊन कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत पक्ष निर्णय घेईल.’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.