
Aashadhi Wari 2025: आषाढी वारीला आजपासून सुरुवात झाली आहे. श्री क्षेत्र देहू इथून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं पंढरपूरकडं प्रस्थान झालं. पण तत्पूर्वी देहूच्या मंदिरात पूजा सुरु असताना तब्बल तीन तास पालखी निघण्यापासून रोखण्यात आली. त्यामुळं पुढे निघालेल्या दिंडी बराच काळ खोळंबून राहिल्या. तसंच चेंगराचेंगरीत दोन महिलाही जखमी झाल्यानं वारकरी चांगलेच संतापलेले दिसून आले. नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात.