

Air Pollution
sakal
- अश्विनी पवार
पिंपरी - वाढत्या लोकसंख्येमुळे वाढलेली बांधकामे, विकासकामे, वृक्षतोड यामुळे शहराचे हवामान दिवसेंदिवस बिघडत आहे. कधीकाळी राहण्यायोग्य शहर असलेल्या पिंपरी चिंचवडची ओळख राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये होत आहे. ‘जागतिक हवामान दिन’ निमित्ताने शहराच्या पर्यावरणाचा आढावा घेतला असता, गेल्या तीन महिन्यांत फक्त १५ दिवस नागरिकांना शुद्ध हवा मिळाली आहे.