
पिंपरी - आनंदाच्या शिधातील हरभरा डाळ न मिळाल्याने शिधापत्रिकाधारक नाराजीचा सूर ओढत आहेत. डाळ खराब आल्याने त्याचे वाटप न करण्याची भूमिका दुकानदारांची असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे शाहूनगर, चिंचवड येथील नागरिकांनी तक्रारीही केल्या. मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शिधापत्रिका कार्यालयाच्या कारभारावर नागरिक संताप व्यक्त करत आहेत.