पिंपळे गुरव : पुणे (Pune) व पिंपरी-चिंचवड (pimpri chinchawad) या शहरांना जोडणाऱ्या बालेवाडी (balewadi) ते पिंपळे निलख चौंधे लॉन्स मार्गावरील बंधाऱ्याला पन्नास वर्षे झाली आहेत. मात्र, त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने तो धोकादायक बनला आहे. १९७१ साली बांधलेल्या या बंधाऱ्याचा मुख्य उद्देश पाणी अडवण्यासाठी होता. परंतु, आता शहरीकरण झाल्यामुळे बऱ्याच वर्षांपासून आता पाणी अडवले जात नाही. बंधारा मजबुतीकरण पुणे की पिंपरी-चिंचवड महापालिका की पाटबंधारे खाते करणार हा वादाचा मुद्दा आहे. (Fifty year old dam is dangerous)
पिंपळे निलख ते बालेवाडी अशी दुहेरी वाहतूक बंधाऱ्यावरून होते. आता पूर्वीच्या तुलनेत वाहतूक कितीतरी पटींनी अधिक वाढली आहे. तसेच वयोमानानुसार बंधाऱ्याला तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी झाडीझुडुपे उगवलेली आहेत. काँक्रिट निखळल्यामुळे आतील लोखंडी गज बाहेर आले आहेत. बऱ्याच ठिकाणी बंधाऱ्याचा भाग जमिनीपासूनच खराब झाला आहे. जुने बांधकाम असल्याने ते बऱ्याच ठिकाणी उखडले आहे. वाहनांतून जाताना बंधाऱ्यावर हादरे जाणवतात. त्यामुळे वाहने आणि पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणाहून नागरिक आणि विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या या बंधाऱ्यांची पाहणी करून योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.
पर्याय नसल्याने या बंधाऱ्यावरून चारचाकी, दुचाकी, तीनचाकी वाहतूकही सुरू आहे. बंधारा बांधला तेव्हा एवढी वाहतूक आणि वजन नक्कीच विचारात घेतलेले नसणार. शिवाय तो आता हा बंधारा जुना झाला आहे. त्यामुळे त्याच्या मजबुती करणाचा विचार गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे.
काँक्रीट निखळून गज बाहेर
पादचारी मार्गाची दुरवस्था
जुने बांधकाम उखडले
मजबुतीकरणाची आवश्यकता
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.