
अश्विनी पवार
पिंपरी : हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि विविध पायाभूत समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० जुलैला येथील विविध प्रशासकीय विभाग, आयटी कर्मचारी संघटना व लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दोन वेळा हिंजवडीला भेट दिली. त्यामुळे, महिनाभरात तेथील यंत्रणा हलली. मात्र, असे असूनही येथील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत ना येथील वाहतुकीचा प्रश्न पूर्णपणे सुटला आहे.