
पिंपरी : ‘हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी माण, मारुंजीतील रस्त्यांचे रुंदीकरण करावे लागेल. काही भागांत नवीन-मोठे रस्ते आवश्यक आहेत. रिंगरोड निर्मिती सुरू आहे. आगामी शंभर वर्षांचा विचार करता शहराच्या पायाभूत विकासासाठी कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. पण, एकाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही,’’ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथे गुरुवारी दिला.