
पिंपरी : गेल्या तीन महिन्यांपासून वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, साचणारे पावसाचे पाणी आणि पायाभूत सुविधांच्या समस्या आदी कारणांमुळे हिंजवडी आयटी पार्कचा विषय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही तो विषय गाजला. सरकारने लक्ष घातले. ‘सकाळ’नेही पाठपुरावा केला. आता त्यावर कार्यवाही सुरू झाली असून ‘पीएमआरडीए’ने विविध रस्त्यांची आखणी करून कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच या भागातील रस्त्यांची समस्या सुटून ते चकचकीत होतील, अशी चिन्हे आहेत.