
पिंपरी : निगडीत बंद ‘डक्ट’चे झाकण उघडून फायबर केबल दुरुस्तीच्या कामासाठी खाली उतरलेल्या तीन कंत्राटी कामगारांचा ‘बीएसएनएल’ व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. त्यामुळे ‘बीएसएनएल’ व ठेकेदारांसाठी कामगारांचा जीव ‘स्वस्त’ झाला आहे का, असा संतप्त सवाल मृतांच्या नातेवाइकांसह कामगार वर्गातून केला जात आहे.