रोजगार वाढल्याचे सांगून
कामगारांच्या जखमेवर मीठ : नखाते

रोजगार वाढल्याचे सांगून कामगारांच्या जखमेवर मीठ : नखाते

पिंपरी, ता. ११ : ‘‘कोरोना संकटामुळे रोजगार आणि आर्थिक व्यवहारांना मोठा फटका बसला आहे. ३० कोटी नागरिक बेरोजगार झाले आहेत. अशावेळी केंद्रीय श्रम मंत्री भूपेंद्र यादव यांनी केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या सर्वेक्षणात सुमारे दोन लाख लोकांना रोजगार मिळाल्याचे जाहीर केले. काम मिळाल्याचे भासवून कामगारांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचे काम केंद्र सरकार करत आहे,’’ अशी टीका कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले आहे. नुकतेच दत्ता शंकर पूशीलकर (रा. कुंभारवाडा, मुंढवा) यांनी दोन वर्षापासून हाताला काम नाही, म्हणून बेरोजगारीमुळे रविवारी रात्री नऊच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. एप्रिल-मे २०२० मध्ये केंद्र सरकारने परिपत्रक काढले होते की, कामगार आणि श्रमिक कामगार ज्यांना कंपनीतून काढून टाकले आहे. अशांना कोरोना कालावधीतला पगार द्यावा. मात्र, यादरम्यान अनेक कंपन्यांनी एकत्र येऊन यास विरोध केला. त्यानंतर, केंद्र सरकारने माघार घेतली आणि पगार मिळेल, या आशेवर बसलेल्या कामगारांची फसवणूक झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com