कचरा केंद्राविरोधात दाद मागणार
किवळे, ता.२८ : किवळे परिसरातील वादग्रस्त कचरा प्रकल्प हटवावा, यासाठी नागरिकांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आहोत, अशी माहिती ॲड. डॉ. आशिष देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी श्याम भोसले, नीलेश तरस, राजेंद्र तरस, कुंडलिक आमले, सुदाम तरस, धर्मपाल तंतरपाळे, सुधाकर पाटील, सुनील प्रधान, प्रवीण पाटील उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले,‘‘सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे की, सार्वजनिक हित डावलून कोणताही प्रकल्प रेटू नये. महापालिकेने नागरिकांना विश्वासात न घेता प्रकल्प उभा करत आहे. त्यामुळे आम्ही याचिका दाखल करत आहोत.’’
कचरा संकलन केंद्र हे ७०० हून अधिक सदनिकाधारकांच्या परिसरात मंजूर करणे, हा अन्याय आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण होणार असल्याचे नीलेश तरस यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.