चला, निसर्ग आपला सखा बनवू या!

चला, निसर्ग आपला सखा बनवू या!

Published on

पिंपरी, ता. ९ ः ‘‘झाड लावणं म्हणजे भविष्य निर्माण करणं’, ‘वृक्षारोपण ही काळाची गरज आहे’, ‘झाडे लावा, झाडे जगवा; निसर्ग आपला सखा बनवा’ या भावनेतून आम्ही ‘MyTree ः मैत्री’ उपक्रमात सहभागी होत आहोत,’’ अशा भावना वृक्षप्रेमी नागरिकांनी व्यक्त केल्या.
पर्यावरण संवर्धन आणि वृक्षांचे महत्त्व संतांनी अधोरेखित केले आहे. शिवाय, यावर्षी संत ज्ञानेश्वर माउली यांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘यशदा रिॲलटी’ यांच्यातर्फे वृक्षारोपण उपक्रम आयोजित केला आहे. त्यामध्ये सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत अनेक नागरिक कुटुंबासह या उपक्रमात सहभागी होत आहेत.

‘एक कुटुंब, एक झाड’
यशदा रिॲलिटी’ हे बांधकाम क्षेत्रातील नामांकित नाव आहे. ग्राहकांना परवडतील असे गृहप्रकल्प उभारून त्यांच्या स्वप्नातील घरे उपलब्ध करून द्यायचे, हा त्यांचा प्रमुख उद्देश असला तरी, निसर्गाचे व समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, या भावनेतून ‘वृक्षारोपण आणि संवर्धनाचा’ वसा त्यांनी घेतला आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ची साथ त्यांना लाभली आहे. ‘एक सदनिका, एक झाड’ अर्थात ‘एक कुटुंब, एक झाड’ अशी ही संकल्पना आहे.

तीन वर्ष राखणार निगा
केवळ वृक्षारोपण करायचे नसून पुढील तीन वर्ष त्याचे संगोपन व संवर्धनही केले जाणार आहे. त्यासाठी नैसर्गिक खत, पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जनावरांपासून संरक्षणासाठी प्रत्येक रोपाची निगा राखली जाणार आहे. ‘यशदा रिॲलटी’च्या ग्राहकांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले जाणार आहे. सुमारे दोन हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. शिवाय, यापूर्वी विक्री केलेल्या सदनिकाधारकांच्या हस्तेही वृक्षारोपण केले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क ः अक्षय - ९५६१३१४६७९

नागरिक म्हणतात...
बालाजी चव्हाण (यशदा फ्लोरेंझा) ः झाड लावणं म्हणजे भविष्य निर्माण करणं! ‘MyTree’ उपक्रमामुळे पर्यावरणस्नेही विचारांना नवी दिशा मिळाली. वृक्षारोपण उपक्रम आयोजित केल्याबद्दल ‘सकाळ’ आणि यशदा रिॲलटी यांचे मनःपूर्वक आभार!

प्रतिभा पाटील (यशदा विंडसॉंग) ः वृक्षारोपण हा केवळ उपक्रम नसून काळाची गरज आहे. सध्या वाढते प्रदूषण आणि पर्यावरणीय असंतुलनामुळे आपण अनेक समस्यांना सामोरे जात आहोत. अशा परिस्थितीत वृक्षारोपण हे निसर्गाशी आपलं नातं अधिक घट्ट करणारं साधन आहे.

शैलेश आनंदे (यशदा सुप्रिम) ः यशदा रिॲलटी ग्रुपने वृक्षारोपणाचा संकल्प करून समाजोपयोगी उपक्रमाची धुरा उचलली आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे. निसर्गाची जोपासना करणारे विकसक म्हणून यशदा रिॲलटी ग्रुप निसर्ग संवर्धक म्हणून त्यांची ओळख निर्माण होईल.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com