प्रस्थान सोहळ्याची संस्थानकडून जय्यत तयारी

प्रस्थान सोहळ्याची संस्थानकडून जय्यत तयारी

संत तुकाराम महाराजांची पालखी दहा जून रोजी तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा ११ जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. या पार्श्वभूमीवर देहू आणि आळंदीतील संस्थान आणि प्रशासनाच्या निरनिराळ्या विभागांनी केलेल्या तयारीचा आढावा घेणारी मालिका आजपासून...


देहू, ता. ६ ः आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या चार दिवसांवर आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी केली आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा आणि पावसापासून संरक्षण मिळावे, या साठी संत तुकाराम महाराज संस्थानने विशेष काळजी घेतली आहे.
आषाढी वारीसाठी जगद्‍गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या दहा जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर संत श्री तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी केली आहे. या बाबत पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे म्हणाले, ‘‘पालखी सोहळ्यातील चांदीचा रथ, अब्दागिरी यांना पॅालिश करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यात ३२९ दिंड्यांची नोंद आहे. नव्याने ४५ दिंड्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. सोहळ्यातील सर्व दिंडीप्रमुखांना संस्थानने पत्रव्यवहार केला आहे. तसेच वाहनांसाठी पास देणे सुरू आहेत. खडकी येथील लष्कराच्या ५१२ डेपोमध्ये चांदीच्या रथाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. हायड्रॉलिक ब्रेक बसविण्यात आले आहेत. तसेच रथावर जीपीएस सिस्टीम बसविण्यात आली आहे. तसेच आठ सीसीटिव्ही कॅमेरे, जनरेटर बसविण्यात आले आहेत. पालखी मार्गावर भाविकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पाणी, आरोग्य, वीज, रस्ते विभागाला पत्रव्यवहार केला आहे. पालकमंत्री आणि विभागीय आयुक्तांना पालखी मार्गावरील समस्यांबाबत माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे पालखी मार्गावर निवाऱ्यासाठी तंबूची व्यवस्था केली आहे.
पालखी मार्गावरील अन्नदानासाठी लागणारे साहित्य खरेदी केले आहे. टाळ, मृदंग, पखवाज, वीणा व पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यात आली आहे. मानकरी सेवेकरी, दिंडी प्रमुखांना पत्र्यव्यवहार केला आहे. देऊळवाड्यातील स्वच्छतेसाठी ३० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सहा सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहे. महाद्वारातून पालखी प्रस्थानाच्या दिवशी दिंड्यांना प्रवेश देण्यात येणार असून, तपोनिधी नारायण महाराज प्रवेशद्वारातून बाहेर जाण्याचा मार्ग आहे. देऊळवाड्यात सुरक्षेसाठी सोळा कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असलेले अब्दागिरी, गरुडटक्के इत्यादी साहित्याचे पॅालिश करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यासाठी संस्थानच्या वतीने दहा हजार गाथा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी मंदिरात दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

देहू ः देऊळवाड्यातील मंदिरांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. तर पालखी आणि सिंहासनाला अंतिम पॅालिश करताना.

(डीयूएच6पी601,602).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com