देशातील बेरोजगारीला केंद्र सरकार जबाबदार कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका देशातील बेरोजगारीला केंद्र सरकार जबाबदार कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका
पिंपरी, ता. २० : भारतातील केवळ १ टक्के अब्जाधीशांच्या ताब्यात देशातील ४० टक्के संपत्ती आहे. तळाच्या ५० टक्के गरीब लोकसंख्येच्या ताब्यात फक्त ३ टक्के संपत्ती आहे. हे ऑक्सफॅमच्या अहवालातून स्पष्ट होत आहे. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देऊन रोजगार व लघु उद्योग वाढीस मोदी सरकार सपशेल अपयशी ठरलेले आहे. बेरोजगारीला कारणीभूत केंद्र सरकार असल्याची टीका कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी नुकतीच केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत पहिल्याच दिवशी ऑक्सफॅम इंटरनॅशनलने वार्षिक विषमता अहवाल सादर केला. त्यामध्ये भारतातील स्थितीबाबत एक स्वतंत्र पुरवणी मांडण्यात आली. भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीत १२१ टक्के प्रमाणे दररोज ३६०८ कोटी रुपयांची भर पडत आहे. गरीब-श्रीमंतीची दरी फार मोठी आहे. श्रीमंत श्रीमंतच होत आहेत.
हे भयानक वास्तव बदलण्याची गरज आहे. यावर्षीच्या प्रारंभीच २४ हजार नोकरदार बेरोजगार झाले. अनेक कंपन्यांनी नोकर कपात सुरू केलेले आहे. अदानी, अंबानी पूरक धोरणांमुळे बेरोजगारी, गरिबीची स्थिती यापुढेही आणखी खराब असू शकते. दरवर्षी दोन कोटी रोजगाराचे स्वप्न हे खोटे ठरले. उलट बेरोजगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याला मोदी सरकारचे कामगार विरोधी धोरण जबाबदार असून, केंद्र सरकारने योग्य पावले न उचलल्यास तरुणांचा देश हा बेरोजगाराचा देश होण्यास वेळ लागणार नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.