उरण विश्लेषण

उरण विश्लेषण

वाघेरे यांच्या आघाडीला ‘ब्रेक’

महेश भोईर
मा वळ लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना, भाजप या महायुतीचे उमेदवार ९६,५५६ मतांनी विजय संपादन केला आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील यांना हार पत्करावी लागली. उरण १९० विधान मतदारसंघाचा विचार केला. श्रीरंग आप्पा बारणे यांनी राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यावर २०१९ च्या निवडणुकीत उरण मतदारसंघात २,८८८ मतांची आघाडी मिळविली होती. बारणे यांना ८९,५८७ मते मिळाली होती. तर पार्थ पवार यांना ८६,६९९ मते मिळाली होती.
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे २०१९ च्या निवडणुकीत एकत्रित शिवसेना आणि भाजप युतीमधून लढले होते. त्यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शेकाप आघाडीचे उमेदवार हे पार्थ पवार होते. मात्र, राजकारणात बदल घडल्याने शिवसेना (शिंदे गट) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वेगळे झाले आणि राजकारणाला नवी कलाटणी आली. आज २०२४ च्या निवडणुकीत दोन्ही शिवसेनेचे उमेदवार हे आमने सामने लढले. महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत झाली. महायुतीमध्ये या उरण मतदारसंघात भाजपचे आमदार असल्याने मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी बारणे यांचे काम मोठ्या प्रमाणात केले. तसे पाहिले तर या मतदारसंघात शिवसेनेची (शिंदे गट) ताकद नसताना बारणे यांना ९१,२८५ मते ही भाजपच्या युतीमुळेच मिळाली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप अशी महाविकास आघाडी असतानाही संजोग वाघेरे यांना १,०४,५३५ मते मिळाली. वाघेरे यांनी उरण मतदारसंघात १३,२५० आघाडी घेतली आहे. वाघेरे यांना उरण मतदारसंघात मोठी आघाडी मिळेल, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे गणित बांधले होते. मात्र, ते गणित फेल गेले. बारणे यांना केवळ १३,२५० मतांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले.
या भागातील विकासाचे मुद्दे होते. गेल्या दहा वर्षांपासून बारणे हे खासदार होते. मात्र, तेवढा बारणे यांचा प्रभाव नव्हता. मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. प्रश्न मार्गी न लावल्याचा फटकाही बारणे यांना या मतदारसंघात बसला. बारणे केवळ निवडणुकीच्या काळात या मतदारसंघात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. ते मतांमधून परावर्तित झाले. प्रामुख्याने कर्जत आणि उरण या मतदारसंघात मूळचा शिवसेनेचा प्रभाव पहिल्यापासून होता. त्यानंतर या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सहानुभूती होती. त्याचा फायदा वाघेरे यांना झाला. तसेच संयमी आणि शांत स्वभावाच्या वाघेरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही प्रभाव या भागात पडल्याचे निकालानंतर दिसून आले. तसेच गेल्या दहा वर्षांत धनुष्यबाण हे चिन्ह सर्वश्रृत आहे. त्याचा प्रचार करणे सोईचे गेले. मात्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेले मशाल चिन्ह गावोगावी पोचविण्यात काही प्रमाणात वाघेरे अपयशी ठरले. बारणे यांच्यावर असलेली नाराजीचा फायदा वाघेरे यांना घेण्याची मोठी संधी या निवडणुकीत होती. मात्र, ती घेण्यात वाघेरे कमी पडले. त्यामुळे अधिक मताधिक्य मिळू शकले नाही. हा मतदारसंघ वाघेरे यांच्यासाठी फायदेशीर होता.
बारणे हे दोनवेळा या मतदारसंघात खासदार झाले. मात्र, संजोग वाघेरे नवीन उमेदवार होते. त्याचाही फटका त्यांना या मतदारसंघात बसला. बारणे यांच्याकडे असणारे धनुष्यबाण हे चिन्ह जुनेच शिवसेनेचे असल्याने अनेकांना मशाल माहीत नसल्याने किंवा मशाल चिन्हाचा प्रचार कमी झाला असल्याने सुद्धा वाघेरे यांना मतदान कमी झाले आहे. ग्रामीण भागात या दहा वर्षांमध्ये बारणे फिरकले नव्हते, त्याचाही फटका बारणे यांना या मतदारसंघात बसला आहे.
विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, महाविकास आघाडी मोठी बनली आहे. अशीच जर आघाडी टिकली तर येणाऱ्या विधानसभा निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com