पर्यावरण संवर्धनाचे साक्षीदारही व्हा !
पिंपरी, ता. १९ ः बहुतांशवेळा सण, समारंभ वा विशेष दिन आला की, अनेकजण वृक्षारोपण करतात आणि विसरून जातात. त्या वृक्षांकडे, त्यांच्या संरक्षण व संवर्धनाकडे दुर्लक्ष होते. परिणामी, वृक्षारोपणाचा उद्देश सफल होत नाही. मात्र, ‘सकाळ’ आणि ‘यशदा रिॲलिटी’ यांनी वृक्ष लागवडीसह त्यांची पुढील तीन वर्षे निगा राखण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी रविवारी (ता. २४) निगडीजवळ मुंबई-पुणे महामार्गालगतच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात सहभागी व्हा ! आणि पर्यावरण संवर्धनाचे साक्षीदारही व्हा !
‘यशदा रिॲलिटी’ हे बांधकाम क्षेत्रातील नामांकित नाव आहे. ग्राहकांना परवडतील, असे गृहप्रकल्प उभारून त्यांच्या स्वप्नांतील घरे उपलब्ध करून द्यायचे, हा त्यांचा प्रमुख उद्देश असला, तरी निसर्ग आणि समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, या भावनेतून ‘वृक्षारोपण आणि संवर्धनाचा’ वसा त्यांनी घेतला आहे. सकाळ माध्यम समूहाची साथ त्यांना लाभली आहे. ‘एक सदनिका, एक झाड’ अर्थात ‘एक कुटुंब, एक झाड’ अशी ही संकल्पना घेऊन वृक्षारोपण केले जाणार आहे. त्यासाठी नैसर्गिक खत, पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. सुमारे दोन हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे.
संतांच्या साक्षीने उपक्रम
पर्यावरण संवर्धन आणि वृक्षांचे महत्त्व संतांनी अधोरेखित केले आहे. शिवाय, यावर्षी संत ज्ञानेश्वर माउली यांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा आहे. त्याचे औचित्य साधून सकाळ माध्यम समूह आणि ‘यशदा रिॲलिटी यांच्यातर्फे वृक्षारोपण उपक्रम आयोजित केला आहे. त्यामध्ये सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद देत अनेक नागरिक कुटुंबांसह या उपक्रमात सहभागी होत आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : अक्षय - ९५६१३१४६७९
नागरिक म्हणतात...
किर्ती कुलकर्णी (यशदा विंडसाँग) ः ‘यशदा’ आणि ‘सकाळ’ यांच्यातर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाबद्दल कौतुक करते. पर्यावरणाचे संरक्षण आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या या स्तुत्य उपक्रम आहे. हा उदात्त उपक्रम हाती घेतल्याबद्दल ‘यशदा’ आणि ‘सकाळ’चे पुन्हा आभार !
विलास लिंबळे (सहकार विकास अधिकारी, राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे) ः ‘झाडे लावा, जीवन वाचवा’, ‘एक झाड लावलं; तर हजारो श्वास सुरक्षित’, ‘झाडे ही पृथ्वीची फुफ्फुसे’, ‘लावा एक रोप, उद्या मिळेल हिरवं जीवन’, वृक्षाविना पृथ्वी शून्य म्हणूनच झाडे लावणे नाही; तर ती जपणेही गरजेचे आहे. झाडे लावणे म्हणजे भविष्यासाठी आशेचा दीप लावणे, या उद्देशाने राबवित असलेला उपक्रम स्तुत्य आहे.
राहुल क्षीरसागर (चेअरमन, यशदा सुप्रिम) ः झाडे लावा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचा आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे हरित क्षेत्र वाढविणे, पर्यावरणातील समतोल राखणे आणि हवामान बदलाच्या दुष्परिणामांवर नियंत्रण मिळवणे. या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.