पुढील दहा वर्षांत एक लाख ब्राह्मण उद्योजक
पिंपरी, ता. २० ः ब्राह्मण समाजाने नोकरीच्या मागे न लागता नोकऱ्या देणारे बनावे, असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केले. पुढील दहा वर्षांत एक लाख ब्राह्मण उद्योजक निर्माण करण्याचा संकल्पही त्यांनी केला.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ उद्योजकता विकास आघाडी आणि ब्रह्मोद्योग फाउंडेशन यांच्यातर्फे पिंपरीत आयोजित ‘ब्रह्मोद्योग स्टार्ट अप कान्क्लेव’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्योजकता विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यजित कुलकर्णी, महासंघाच्या ब्रह्मद्योग आघाडीचे अध्यक्ष त्रिविक्रम जोशी, उद्योग आघाडीचे अध्यक्ष तसेच उद्योजक प्रसन्न देशपांडे यावेळी उपस्थित होते.
सत्यजित कुलकर्णी म्हणाले, ‘‘ब्राह्मण समाज सक्षम होण्यासाठी समाजात जास्तीत जास्त उद्योजक घडले पाहिजेत.’’ महासंघाद्वारे उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या मदतीची माहिती देऊन त्यांनी पुढील काळात मार्गदर्शन आणि आर्थिक मदत देऊन अधिकाधिक उद्योजक कसे घडवले जातील याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
चंद्रशेखर चिंचोळकर, अविनाश चाबुकस्वार आणि सौमित्र घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध तज्ज्ञांनी आयात-निर्यात शासकीय कर्ज योजना, मार्केटिंग, एआय आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
त्रिविक्रम जोशी यांनी महासंघातर्फे पुढील वर्षी फेब्रुवारीत बंगळूरला होणाऱ्या ब्रह्मोद्योग परिषदेबाबत माहिती दिली. देशपांडे यांनी निर्यातीबाबत मार्गदर्शन केले. उद्योजकता विकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रसाद गिजरे यांनी आभार मानले. निखिल लातूरकर, जिल्हाध्यक्ष राजीव देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या. दिलीप सातभाई, सचिन कुलकर्णी, मंदार रेडे, केतकी कुलकर्णी, नीता कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, सुषमा वैद्य, आरती कोशे, वैशाली कुलकर्णी, सुशांत पाठक, किरण प्रभुणे, मकरंद कुलकर्णी, भालचंद्र जोशी, अश्विन इनामदार, सुनील कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, अभय कुलकर्णी आदींनी संयोजन केले. ब्रह्मोद्योग पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी आभार मानले. स्मिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
युवा उद्योजकांचा सन्मान
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप झाला. त्यांच्या हस्ते ब्राह्मण समाजातील युवा उद्योजक अभिषेक तिळगुळकर, पूर्वा गुंफेकर, विशाल देशपांडे, विवान कारूळकर, ओंकार बाजी, सौरभ घाटणेकर आणि अजिंक्य इनामदार यांना सन्मानित करण्यात आले.
---
शासकीय नोकऱ्या पुढील काळात सर्वांनाच मिळणे अवघड आहे. कौशल्यवृद्धीद्वारा नावीन्यपूर्ण विचार करून जास्तीत जास्त उद्योजक घडणे ही काळाची गरज आहे.
- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.