नवरात्रोत्सव उपवासात सांभाळा आहार अन् आरोग्य
पिंपरी, ता. २२ : आदिशक्तीची उपासना करण्यासाठी नवरात्रात अनेक महिला व तरुणी नऊ दिवस उपवास करतात. यावर्षी नवरात्र हे दहा दिवस आहे. या काळात उपवास केल्यास शरीर कमकुवत होऊ नये, यासाठी आहाराचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, असस सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.
अनेकदा महिलांमध्ये हिमोग्लोबिन, बी-१२ जीवनसत्त्वाची कमतरता असते. उपवासादरम्यान आहाराकडे दुर्लक्ष झाल्यास अशक्तपणा येऊन आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी आहारात विविधता ठेवावी, हलका आहार घ्यावा. उपवासात राजगिरा, वरई, शिंगाड्याच्या पिठाची भाकरी किंवा डोसे, राजगिऱ्याची भाजी, लाल भोपळ्याचे सेवन करावे. तर साबुदाणा खिचडी, बटाटा, रताळी, शेंगदाणे यांचे सेवन कमी प्रमाणात करावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
हल्ली महिलांना घरासोबतच नोकरी किंवा व्यवसायदेखील सांभाळावा लागतो. कामानिमित्त दिवसभर बाहेर असल्याने ताकद टिकवून ठेवण्यासाठी महिलांनी आहारात सुक्या मेव्याचा आवर्जून समावेश करावा. दुपारच्या वेळी आहारात काजू, बदाम, अक्रोड, काळे मनुके व खजूर खाल्ल्यास हिमोग्लोबिनची कमतरता जाणवणार नाही. उर्जा मिळण्यासाठी डाळिंबासारख्या फळाचेही उपवासादरम्यान सेवन करू शकतो, असे डॉक्टर सांगतात.
वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला...
साबुदाण्याच्या पदार्थांचे सतत सेवन टाळा
उपवास काळात भरपूर पाणी प्या
तेलकट व तळलेले पदार्थ पूर्ण टाळा
हलका आहार ठेवा
एकाच वेळी जास्त खाऊ नका
हल्ली महिलांमध्ये व तरुणींमध्ये लोह आणि हिमोग्लोबिनची कमतरता आढळून येते. त्यामुळे नवरात्रीतील उपवास करताना परिपूर्ण आहार घ्यावा. सकाळी व रात्रीचे जेवण लवकर घ्यावे. आहार हलका व पौष्टिक ठेवावा. सुका मेवा, फळे यांचे योग्य प्रमाणात सेवन करावे.
- डॉ. नीलेश लोंढे, आयुर्वेदाचार्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.