पवनमावळातील तीन धरणे ओव्हरफ्लो; 
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पवनमावळातील तीन धरणे ओव्हरफ्लो; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Published on

सोमाटणे, ता. २८ : संततधार पावसामुळे पवनमावळातील मळवंडी, आढले आणि पुसाणे ही तीनही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसाचा जोर मध्यरात्री आणखी वाढला. यामुळे धरणांच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले आहे. कासारसाई धरण क्षेत्रातही पावसामुळे पाणीपातळी झपाट्याने वाढत असून नियंत्रणासाठी सध्या पाचशे क्युसेक्सप्रमाणे विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
या विसर्गामुळे आढले आणि कासारसाई नदीला पूर आला आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवला जाणार असल्याने नागरिकांनी नदीपात्रात उतरणे टाळावे, तसेच जनावरे नदीपात्रापासून दूर न्यावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता डी. एम. दुबल (पुणे पाटबंधारे विभाग) यांनी केले आहे.
दरम्यान, पावसामुळे फुलशेती, फळभाज्या, कडधान्य आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com