संघाची शाखा हे संस्कार केंद्र ः दिलीप क्षीरसागर
पिंपरी, ता. ३ ः ‘‘संघाची शाखा हे संस्कार केंद्र असून, संघशाखेतून शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकास होऊन चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व घडते,’’ असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीप क्षीरसागर यांनी केले.
संभाजीनगर येथील साई मंदिर उद्यानात झालेल्या विजयादशमी शस्त्रपूजन उत्सवात क्षीरसागर बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून शिवाजीराव आखाडे, नगर कार्यवाह महेंद्र रेमणे प्रामुख्याने उपस्थित होते. क्षीरसागर म्हणाले, ‘‘डॉ. हेडगेवार यांच्या १९२५ ते १९४० या कालखंडात त्यांनी हिंदू समाजाला जागृत करणे, गुलामगिरीच्या मानसिकतेतून समाजाला बाहेर काढणे, सामाजिक समरसता वाढवणे, समाजातील दोष दूर करणे, स्वयंसेवकांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. गोळवलकर गुरुजी यांचे दुसरे पर्व १९४० ते १९७३ कालखंडात होते. त्यांनी अनेक क्षेत्रात काम सुरू केले व व्यवस्था परिवर्तन करण्यास सुरुवात केली. भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनसंघ, विश्व हिंदू परिषद इत्यादी संघटनांची स्थापना या पर्वात झाली. तिसरे पर्व बाळासाहेब देवरस यांचे होते. त्या पर्वात समाजातील विषमता घालवून सामाजिक समरसता वाढवणे, आणीबाणीच्या कठीण कालखंडातील संघाची वाटचाल या विषयांवर काम झाले संघ शताब्दी वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंच परिवर्तनाच्या स्वबोध, नागरी कर्तव्ये, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण या विषयांवर काम करणार असून, सर्व समाजाने सोबत यावे. पारंपरिक शस्त्रपूजन, शेकडो स्वयंसेवकांचे दिमाखदार पथसंचलन झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.