परतीच्या पावसाने भात पिकाचे नुकसान
सोमाटणे, ता. ३१ ः परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या भात पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने भात पीक चांगले आले आहे, त्यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पवनमावळातील शेतकऱ्यांनी दिवाळीनंतर भात कापणीला सुरवात केली होती. परंतु, अचानक परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेला भात शेतातच भिजला, काही ठिकाणी भात खाचरातील भात जमिनीवर कोसळल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. 
PNE25V63867
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

