बैलांच्या पत्री व्यवसायाला ‘साखर’ दिवस

बैलांच्या पत्री व्यवसायाला ‘साखर’ दिवस

Published on

सोमाटणे, ता. ७ : बैलांना पत्री मारण्याचे दर वाढल्याने पत्री बसवणाऱ्या कारागिरांना चांगले दिवस आले आहेत. फक्त सहा महिन्यांच्या ऊस हंगामातच त्यांना वर्षभराची कमाई होत आहे.
पूर्वी पत्र्यांचे दर कमी असल्याने बैलांना पत्री बसवताना कारागिरांना कमी मजुरीत काम करावे लागे. त्यामुळे कुटुंबाचा खर्च भागवताना त्यांची तारांबळ उडत असे. मात्र, गेल्या तीन वर्षांत पत्र्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सध्या एका बैलजोडीच्या पत्र्याचा दर सुमारे दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ऊस वाहतुकीदरम्यान बसवलेली पत्री केवळ महिनाभर टिकते. त्यामुळे दर महिन्याला ती बदलावी लागते. साखर कारखान्याचा गळीत हंगाम साधारणपणे पाच ते सहा महिने चालतो. या काळात बैलगाडी मालकाला बैलांना किमान पाच ते सहा वेळा नवीन पत्री बसवावी लागते. अशा प्रकारे एका बैलजोडीपासून एका हंगामात कारागिराला दहा ते बारा हजार रुपये उत्पन्न मिळते.
कारखान्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या पन्नासपेक्षा अधिक बैलगाड्या असल्याने, या सर्वांकडून कारागिरांना एका हंगामात किमान पाच लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे साखर कारखान्याच्या गळीत हंगामामुळे बैलांना पत्री बसवणाऱ्या कारागिरांच्या व्यवसायाला ‘साखर’ दिवस आले आहेत.

‘‘बैलांना पत्री बसवण्याचा व्यवसाय हा केवळ साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असेपर्यंत, म्हणजे सहा महिन्यांपुरताच चालतो. नंतरचे सहा महिने फारसा व्यवसाय नसतो. त्यामुळे हंगामात मिळालेले पैसेच वर्षभर पुरवावे लागतात.’’
- सुनील घोडके, पत्री कारागीर, दारुंब्रे

PNE25V65891
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com