सिग्नल सुरु करून पोलिस नेमण्याची मागणी
पिंपरी, ता. २५ ः निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते त्रिवेणीनगर चौक या मार्गावरील अंकुश चौकासह परिसरातील सर्व सिग्नल सुरु करून, वाहतूक पोलिस नेमावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.
निगडी वाहतूक विभागाला निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार, अंकुश चौक हा रस्ता चौपदरी असून भक्ती-शक्ती चौकापासून नाशिक महामार्गाला जोडत आहे. मात्र, या मार्गावरील सिग्नल बंद आहेत. दरम्यान, या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून शाळा, महाविद्यालये आहेत. तसेच कामगार वर्गही मोठा असल्याने या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. निगडी गावठाण, साईनाथ नगर, रुपीनगर, सहयोग नगर, राजनगर या भागातील नागरिकांना पायी रस्ता ओलांडावा लागतो. दरम्यान, या मार्गावर सिग्नल यंत्रणा नसल्याने वाहने सुसाट धावत असतात. यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. या मार्गावरील बंद असलेले सर्व सिग्नल सुरु करून, वाहतूक पोलिसांचीही नेमणूक करावी, अशी मागणी वाहतूक आघाडीचे जिल्हा प्रमुख नितीन सूर्यवंशी व निगडी शाखाध्यक्ष सागर बहुले यांनी केली आहे.
-------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.