‘मानसिक शांततेसाठी
गीतेचे वाचन आवश्यक’

‘मानसिक शांततेसाठी गीतेचे वाचन आवश्यक’

Published on

पिंपरी, ता. १४ : ‘जीवनात वाटचाल करताना काय चांगले आणि काय वाईट हे नेमकेपणाने कळण्यासाठी भगवद्गीतेचे वाचन आवश्यक आहे. तसेच आजच्या धकाधकीच्या काळात मानसिक शांतता मिळविण्यासाठी गीतेचे नियमित वाचन नियमित करावे,’ असे प्रतिपादन भाग्यश्री गोखले यांनी केले. पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डन परिसरात श्री संत ज्ञानेश्वर ब्राह्मण संस्थेचा मासिक मेळावा नुकताच झाला. यावेळी त्यांनी व्याख्यान दिले. संस्थेचे अध्यक्ष विलास जोशी, सदस्य डॉ. विलास भाले यांच्यासह नागरिक उपस्थित होते. नवी दिल्लीत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी परिषदेत ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल डॉ. भाले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संस्थेच्या उपाध्यक्षा स्नेहा चिंचवडकर यांनी केले.
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com