वाचक लिहीतात
वाचक लिहितात
तळेगाव दाभाडे येथे खूप नागरी समस्या आहेत. नवीन इमारती उभ्या राहात आहेत. मुळात पाणी पुरवठा सुरळीत नाही. वीज पुरवठा नियमित नाही. गटारे, नाले देखील भूमीगत करण्याची गरज आहे. रस्ते रुंदीकरण, डांबरीकरण करणे आवश्यक आहे. बारीक खडी टाकून त्यावर योग्य वजनाचा रोलर फिरवला की नाही, डांबरीकरण व्यवस्थित होते आहे की नाही यावर लक्ष कोण ठेवणार ? रस्त्यांना नावेच नाहीत. वास्तविक नामफलक सोईचे ठरतात. सोसायट्यांनी त्यांच्या परिसरातील अनावश्यक वाढलेली झाडे कापून घ्यायला हवीत, त्यासाठी परवानगी कशाला हवी ? घंटागाडी-कचरा गाडी नियमित येत नाही. त्याऐवजी मुंबईप्रमाणे ८-१० घरांमध्ये कचराकुंड्या ठेवाव्यात. दिवसभरात घंटागाडी केव्हाही कचरा घेऊन जाईल. वाढलेली झाडे कापल्यानंतर आणि पानगळ झाल्यानंतर ते उचलायला नियमित गाडी फिरवावी.
- प्रकाश वा. दातार, यशवंत नगर
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

