मावळातील शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या : शिवसेना
वडगाव मावळ, ता. ३० : ‘‘पावसामुळे भात रोपांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी. तसेच आवश्यकता असलेल्या शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून द्यावीत,’’ अशी मागणी मावळ तालुका शिवसेनेने केली आहे.
‘‘यंदा पावसाळा लवकर सुरू झाला. त्यामुळे पुरेशा प्रमाणात पेरण्या न झाल्याने भात लागवडीसाठी रोपे कमी प्रमाणात उगवली आहेत. पावसामुळे भात व इतर पिकांचे किती नुकसान झाले व किती हेक्टरवर भात लागवड होणार आहे, याची आकडेवारी जाहीर करावी. पंतप्रधान पीक विमा किती शेतकऱ्यांनी घेतली आहे. जिल्हा बँकेमार्फत शेतकरी पीक कर्ज घेतात. तेव्हा किती शेतकऱ्यांचा पीक विमा स्थानिक सोसायटीच्या मार्फत बँकेने उतरवला आहे. याची आकडेवारी जाहीर करावी,’’ अशी मागणी शिष्टमंडळाने कृषी अधिकारी मारुती साळे यांच्याकडे केली आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, विशाल हुलावळे, राजेश वाघोले, चंद्रकांत भोते, मदन शेडगे, नवनाथ हरपुडे, सोमनाथ कोंडे, सतीश इंगवले, अनंता आंद्रे, माऊली मावकर, मंगेश हुलावळे आदींनी निवेदन दिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.