
महायुती सरकारच्या अथक प्रयत्नांना दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ यश मिळाल्यामुळे आपल्या मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा प्राप्त झाला. या गौरवाच्या प्रेरणेतून,१ मे २०२५ रोजी मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर येथे ‘राजभाषा मराठी दिन विशेष कार्यक्रम’ पार पडला.या कार्यक्रमात मा. मंत्री डॉ. उदय सामंत, मराठी भाषा विभागाचे सचिव आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत‘अभिजात मराठी’ या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोगो आणि घोषणा करण्यात आली.