ओरोस : आतापर्यंत रंगभूमीवर स्वराज्याबाबत आलेल्या नाटकांचा समारोप शिवराज्याभिषेक सोहळ्याने होत होता. त्या पुढील छत्रपती संभाजी राजे, छत्रपती राजाराम राजे आणि रणरागिणी ताराराणी यांचा इतिहास दाखविला नाही. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यानंतर २७ वर्षांचा काळ दुर्लक्षित राहिला. पाठ्यपुस्तकातही विस्तृत लिखाण झालेले नाही.