
Marathi Entertainment News : मराठी मालिकांच्या इतिहासात सगळ्यात जास काळ चाललेली मालिका म्हणजे चार दिवस सासूचे. कविता मेढेकर, रोहिणी हट्टंगडी यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका खूप गाजली. सगळ्यात जास्त एपिसोडचा विक्रमही या मालिकेने केला. नुकतंच एका मुलाखतीत अभिनेत्री कविता मेढेकर यांनी या मालिकेविषयी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.