

ARJUN BHANUSHALI EXIT FROM THARLA TAR MAG
ESAKAL
छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काहीही घडलं तरी प्रेक्षकांना त्याचा धक्का बसतो. गेल्या काही काळात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यात. तर काही मालिकांमधून कलाकारांची एक्झिट झालीये. आता स्टार प्रवाहच्या टॉपच्या मालिकेतही काही उलथापालथ होणार असल्याचं बोललं जातंय. टीआरपीमध्ये गेली तीन वर्ष टॉपला असणाऱ्या 'ठरलं तर मग' मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोवरून मालिकेचा मुख्य नायक म्हणजे अर्जुन सुभेदार आता मालिका सोडून जाणार का असा प्रश्न विचारला जातोय. असं काय आहे त्या प्रोमोमध्ये?