

amruta khanvilkar
ESAKAL
'२००९ साली आलेल्या 'नटरंग' या चित्रपटाने प्रेक्षकांना मोहिनी घातली होती. रवी जाधव यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. या चित्रपटातील गाण्यांनी तर प्रेक्षकांना वेड लावलेलं. यात अभिनेता अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील गाणी संगीतकार अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली. ही गाणी प्रचंड गाजली. त्यातलं 'मला जाऊद्या ना घरी आता वाजले की बारा' हे गाणं प्रचंड हिट ठरलं. आजही प्रत्येक कार्यक्रमात हे गाणं वाजतं. मात्र या गाण्यासाठी अमृता खानविलकरला किती पैसे मिळाले होते हे तुम्हाला ठाऊक आहे का? आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने हा खुलासा केलाय.