

colors marathi serial going off air
ESAKAL
गेल्या काही महिन्यात मराठी वाहिन्यांवर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. तर झी मराठी आणि स्टार प्रवाहने आणखीही नव्या मालिकांची घोषणा केलीये. अशातच कलर्स मराठीने देखील काही नव्या मालिकांची घोषणा केली होती. आता या नव्या मालिकांसाठी काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. नव्या मालिकेच्या वेळेनुसार, 'स्वामी समर्थ' यांची मालिका संपण्याचा अंदाज प्रेक्षकांनी लावला होता. मात्र आता दुसरीच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजतंय. नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग शूट झालाय.