
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या असतात. एखादी मालिका प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहते. तर काही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतात. मात्र मालिकांचं हे गणित पूर्णपणे टीआरपी यादीवर अवलंबून असतं. त्यात जी मालिका चांगले नंबर आणते ती जास्त काळ चालते. मात्र ज्या मालिकेचा टीआरपी कमी असतो. ती मालिका लवकरच बंद करण्यात येते. आता मागील आठवड्याचा टीआरपी समोर आलाय. यात 'घरोघरी मातीच्या चुली मालिकेने मोठी झेप घेतल्याचं दिसतंय.