

bhagyashree dalavi
esakal
छोट्या पडद्यावरील कमळी ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीये. सध्या मालिकेत कमळीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा दाखवला जातोय. उच्च शिक्षणासाठी गाव सोडून नवीन शहरात आलेल्या कमळीने तिच्या स्वप्नाच्या दिशेने पहिलं मोठं पाऊल टाकलंय. पदवी शिक्षणाच्या पहिल्या वर्षात ती उत्तीर्ण झालीये. विशेष म्हणजे तिचा निकाल स्वतः शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते जाहीर केला जातो. मात्र कमळीला किती टक्के मिळालेत माहितीये का?