

tharla tar mag
esakal
आपल्या हटके कथानकामुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी महाराष्ट्राची महामालिका म्हणून ओळख असणाऱ्या 'ठरलं तर मग' मध्ये आता पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट येणार आहे. सध्या मालिकेत सायलीला लहानपणीचे प्रसंग दिसतायत, तिला स्वतःचा चेहरा दिसतोय मात्र ती या मुलीला ओळखत नाहीये आणि तिला स्वतःचाच चेहरा लक्षात नाहीये. त्यामुळे मालिका पुढे सरकत नाहीये. दुसरीकडे सचिन आणि अस्मिता यांची घटस्फोटाची केस सुरू आहे. कोर्टात त्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र अशातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री झाली आहे.