वेगळं राहण्यासाठी लग्न केलंय का? प्रसाद जवादे वैतागला; पत्नी अमृता देशमुख समजूत काढत म्हणाली-

AMRUTA DESHMUKH TALKEDON LONG DISTANCE AFTER MARRIAGE: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख लग्नानंतरही वेगळे राहत असल्याने अभिनेता वैतागला आहे.
PRASAD JAWADE

PRASAD JAWADE

esakal

Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांनी दोन वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली. 'बिग बॉस मराठी ४' मध्ये त्या दोघांची भेट झाली होती. या शोमध्ये ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. बिग बॉसच्या घरात तशा अनेक जोड्या जुळतात. मात्र बाहेर आल्यानंतर त्या टिकत नाहीत. प्रसाद आणि अमृता याला अपवाद ठरले. त्यांनी बाहेर आल्यावर वर्षभरातच लग्नगाठ बांधली. १८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसाद आणि अमृता विवाहबद्ध झाले. मात्र आता त्यांच्यासमोर एक मोठा पेच आहे. लग्न झालेलं असूनही ते दोघे वेगळे राहत आहेत. अमृताने याबद्दल स्पष्टीकरण दिलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com