

PRAVIN TARDE ON FARMERS
ESAKAL
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारे लोकप्रिय अभिनेते प्रवीण तरडे यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. 'धर्मवीर', 'मुळशी पॅटर्न 'देऊळबंद' यांसारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवलं. त्यांचा अभिनय आणि करारा आवाज यांचे अनेक चाहते आहेत. आता लवकरच त्यांचा 'देऊळबंद २' हा चित्रपट येतोय. त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत प्रवीणने यांनी शेतकऱ्याची बाजू मांडलीये. शेतकरी कधीही स्वतः पिकवलेला माल स्वखुशीने शेतात टाकून देत नाही असं प्रवीण यांनी म्हटलंय.