

Ayush Bhide
ESakal
आपल्या आयुष्यात कधी कोणता दिवस पाहावा लागेल सांगता येत नाही. त्यातही आपल्या आईवडीलांचा मृत्यू आपल्या डोळ्यांनी पाहणं हे खूप अवघड असतं. मात्र मराठी अभिनेत्याने फक्त १४ दिवसात त्याच्या आईवडिलांना गमावलं. 'आई कुठे काय करते', 'प्रेमाची गोष्ट' यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार अभिनेता आयुष भिडे याने त्याच्या आयुष्यात काही अशा प्रसंगांना तोंड दिलंय जे आपल्या आयुष्यात कधीही येऊ नयेत असं वाटतं. करोना काळात आयुषने त्याच्या आईवडिलांना गमावलं. नुकत्याच महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या कटू आठवणी सांगितल्यात.