
८०च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक नायिका होत्या. मात्र त्या सगळ्यांना एक मराठी अभिनेत्री काटे की टक्करदेत होती. जिने भल्याभल्या अभिनेत्रींना पाणी पाजलं. स्वतःच्या मेहनतीच्या बळावर तेव्हाची टॉप अभिनेत्री बनली. मराठी असूनही तिने मोठमोठ्या बॉलिवूड अभिनेत्रींना पछाडलं. चित्रपटांसोबतच ती अनेक मालिकांमध्येही झळकत होती. तिच्या अभिनयाचे आणि रूपाचे अनेक चाहते होते. मात्र करिअरच्या शिखरावर असताना तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळामुळे ती तिच्या आयुष्याची लढाई मात्र अर्ध्यातच हरली. त्यानंतर तिच्या पतीने तिच्याच घरच्यांवर उलट आरोप केले होते.