

स्वतःच्या हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मग ते घर शहरात असो किंवा गावात. स्वतःच्या हक्काचा आशियाना असावा असं प्रत्येकालाच वाटतं. गेल्या वर्षभरात अनेक मराठी कलाकारांनी त्यांचं हक्काचं घर घेतलं. ऐश्वर्या नारकर ते मधुराणी प्रभुळकर यांनीही नव्या घराचा श्रीगणेशा केला. आता या यादीमध्ये आणखी एक नाव जोडलं गेलंय. 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील अभिनेत्रीने मुंबईत तिचा हक्काचा आशियाना घेतलाय. तिने तिचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण केलंय. ही अभिनेत्री आहे नुपूर चितळे'.