Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Sankarshan Karhale: राजकीय परिस्थितीवर आधारित असणारी कविता संकर्षणनं एका कार्यक्रमात सादर केली. या कवितेचा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला.
Sankarshan Karhale
Sankarshan Karhaleesakal

Sankarshan Karhale: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या एका कवितेमुळे चर्चेत आहे. राजकीय परिस्थितीवर आधारित असणारी कविता संकर्षणनं एका कार्यक्रमात सादर केली. या कवितेचा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. अशातच संकर्षणनं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत कविता सादर केल्यानंतर आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.

संकर्षण म्हणतो, "माझा फोन खूप श्रीमंत झाला"

संकर्षणनं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं,"हा विषय जरा संवेदनशील आहे. त्यामुळे कविता सादर करताना थोडी धाकधूक होती.मी नागरीक म्हणून हे मांडलं आणि ते प्रेक्षकांनी स्विकारली."

पुढे संकर्षण म्हणाला, "गेल्या दोन दिवसांत माझा फोन खूप श्रीमंत झालाय, असं मला वाटतंय. मला खूप जणांचे फोन आले. ही मोठी माणसं खरंच खूप मोठी असतात, हे मला कळालं, आपण उगाच हेवेदावे करून चिखल करून घेतो. मला राज ठाकरे साहेबांचा, उद्धव ठाकरे साहेबांचा, विनोद तावडे साहेबांचा फोन येऊन गेला. यांचे आवाज मी स्वत:च्या कानांनी ऐकलेत. शरद पवार साहेब माझ्याशी स्वत: बोलले नाहीत पण, त्यांच्या निकटवर्तीयांनी मला फोन केला होता. ते मला म्हणाले की, मी तुमच्या सगळ्या कविता साहेबांना ऐकवतो. ही कविता सुद्धा मी त्यांना पाठवली आहे. त्यांना ही कविता खूप आवडली. या निवडणुका झाल्यावर तुम्ही एकदा त्यांना सगळ्या कविता ऐकवा."

Sankarshan Karhale
Sankarshan Karhade: "ती सभा, ती गर्दी, तो आवाज, ती घोषणा..."; सध्याच्या राजकीय परिस्थितीवर संकर्षण कऱ्हाडेची खास कविता, व्हिडीओ एकदा बघाच

राज ठाकरेंनी संकर्षणला घरी भेटायला बोलवलं

राज ठाकरेंनी संकर्षणला त्यांच्या घरी बोलावले होते. याबद्दल संकर्षण म्हणाला,"राज ठाकरेंनी मला फोन करून भेटायला घरी बोलावलं. त्यांनी अकरा वाजताची वेळ मला दिली होती. मी सकाळी साडेसात वाजता मिरारोडवरून निघालो. मी नऊ वाजता शिवाजी पार्क परिसरात पोहोचलो आणि आकराच्या आधी मी तिथेच अडीच तास फेऱ्या मारत होतो. मी त्यांच्या घरात गेलो आणि माझ्या घरच्या ग्रुपवर मेसेज टाकला मी आत येऊन बसलोय. तेव्हापासून आमचे बाबा सारखे बीपीच चेक करत होते. हे सगळं मी जाऊन राज साहेबांना सांगितलं. ते देखील मिश्किल आहेत ते म्हणाले, 'घरच्यांना सांगा सुखरुप निघालोय' मी राज साहेबांसोबत खूप गप्पा मारल्या"

ऐका संकर्षणची कविता:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com