

SAYLI AND PRIYA FIGHTIN THARLA TAR MAG
ESAKAL
छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. मालिका टीआरपीमध्ये राहण्यासाठी मालिकांमध्ये निरनिराळे ट्विस्ट टाकण्यात येतात. असाच एक ट्विस्ट आता 'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेत येणार आहे. स्टार प्रवाहाची 'ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. गेली तीन वर्ष ही मालिका टीआरपीमध्ये १ नंबरवर आहे. मात्र सतत तेच तेच दाखवून मालिका रटाळ झाल्याने आता प्रेक्षक तन्वीचं सत्य समोर आणण्याचा आग्रह करत आहेत. त्यामुळेच मालिकेत आता भलताच ट्विस्ट दाखवण्यात येणार आहे.