

MARATHI SERIAL TRP
ESAKAL
छोट्या पडद्यावर मालिकांमध्ये सुरू असते ती टीआरपीची स्पर्धा. याच टीआरपीवर मालिका किती काळ वाहिनीवर सुरू राहणार याचा निर्णय होतो. चांगला टीआरपी आणि कथा असलेल्या मालिका सहसा चॅनेल बंद करत नाहीत. जास्त टीआरपी येण्यासाठी वाहिन्या मालिकांमध्ये निरनिराळे ट्विस्ट आणत असतात. तर कधी मालिकांच्या वेळा बदलतात. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहने असाच मालिकांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला होता. आता वाहिनीचा हा निर्णय योग्य असल्याचं दिसतंय. कारण या आठवड्यात स्टार प्रवाहच्या मालिकांनी झी मराठीच्या मालिकांना धोबी पछाड दिलंय.